गुरुवार, २८ जून, २०१२

इष्टापदा

पोळलेल्या माणसांचे काय सांगू,
पेटल्या मंत्रालयाचे काय सांगू

वाद नाही, काय ते आक्रीत होते !
आपदा इष्टापदांचे काय सांगू

धड धडा ह्या फायली साऱ्या जळाल्या
गूढ होते काय त्याचे , काय सांगू

 सोडला नि:श्वास त्यांनी दाटलेला
 दैव  होते थोर त्यांचे , काय सांगू

वाचले ते नेमके होते पुढारी,
जीव गेले माणसांचे  ! काय सांगू

संविधाना,  झोप की हे सोंग यांचे 
मानभावी  लांडग्यांचे , काय सांगू
    _डॉ. सुनील अहिरराव